बुध दि [ प्रकाश राजेघाटगे ]
सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडून ग्रामपंचायत कर्मचारी यांना न्याय देण्याची भूमिका निश्चितपणे पार पडली जाईल असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळात सांगितले. या शिष्ट मंडळामध्ये जिल्हा उपाध्यक्ष जावेदभाई पठाण ,संतोष झणझणे, रामदास वाकचौडे ,अमोल काळोखे, प्रशांत साळुंखे आधी सह कर्मचारी उपस्थित होते.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की सातारा जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत कामगारांचे वेतन पंचायत समितीला सोडले नाही त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी उपासमारीची वेळ आली आहे. यामध्ये दहा महिन्यातील वेतनातील फरक मागील वेतन व मार्चपासून आज अखेर वेतन न मिळाल्याने कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामध्येच जिल्हा परिषदेतून पंचायत समितीला वेतन आल्यानंतर प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या खात्यावर आधा होण्यासाठी कमीत कमी एक महिन्याचा कालावधी लागतो या इतक्या खडतर प्रवासानंतर कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार होण्यासाठी कमीत कमी 70 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे सदरचे वेतन हे आम्हाला राज्य शासनाकडून पूर्वीप्रमाणे खात्यावर जमा करावे अशी संघटनेने मागणी करण्यात आली आहे.
Social Plugin