Ticker

6/recent/ticker-posts

अखेर "सत्संग विहार" गुन्हा दाखल; नदी नाले बचाव समितीच्या पाठपुराव्याला यश



बदलापूर प्रतिनिधी: 

बदलापूर पश्चिम – उल्हास नदी पात्रात सत्संग विहार समिती, हेंड्रेपाडा यांच्यातर्फे करण्यात आलेल्या बेकायदेशीर भराव व संरक्षण भिंत बांधकाम प्रकरणी अखेर कायद्याचा कठोर हात पडला आहे. महसूल विभागाच्या आधीच्या कार्यवाहीनंतरही संबंधितांनी भराव न हटवल्याने आणि आदेशाचे उल्लंघन केल्याने दहा कोटी सत्तरा लाखांहून अधिक दंडाची रक्कम आकारण्यात आली होती.महसूल विभागाचे स्पष्ट आदेश असूनही भराव न हटवल्याने, उल्हास नदी बचाव समिती, महसूल प्रशासन, आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पाठपुराव्यामुळे अखेर सत्संग विहार समितीचे प्रमुख भजन कुमार रॉय यांच्यावर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसीलदार अमित पुरी यांनी ठोस कार्यवाही करत सत्संग विहार समितीवर १० कोटी १६ लाख १७ हजार १४१ रुपयांचा दंड ठोठावन्यात आले होते.सत्संग विहार यांनी अनधिकृतरित्या उल्हासनदी पात्रात केलेला भराव हा ८ हजार ९१२ ब्रास माती, १९६ ब्रास दगड आणि ८३ ब्रास दगड पावडर इतका आहे. त्यामुळे या गौण खनिजाचा दंड ९ कोटी ९३ लाख ६७ हजार १४१ इतका आहे. तर या भरावासाठी वापरण्यात आलेली यंत्र समुग्रीचा जातमुचलका रक्कम २२ लाख ५० हजार इतकी आहे. हा दंड येत्या सात दिवसात जमा करण्याचे आदेश अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांनी दिले होते 

शासनाच्या या कारवाईवर सत्संग विहारच्या समितीने कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याची व शासनाचा अपमान झाल्याची शाश्वती मिळताच अधिकाऱ्यांनी सत्संग समितीचे प्रमुख भजन कुमार रॉय व इतर पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई बदलापूर व परिसरातील पूरग्रस्त नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी आहे. ही लढाई केवळ कायद्याचीच नव्हे तर निसर्ग व पर्यावरणाच्या संरक्षणाची होती–आणि ती आपण जिंकली आहे भावना समितीने व्यक्त केली लढ्याचे यश हे केवळ प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळेच नव्हे, तर मीडिया क्षेत्रातील पत्रकार बंधूंच्या जागरूकतेमुळे शक्य झाले आहे. त्यांनी या मुद्द्याचे गांभीर्य ओळखून सातत्याने बातम्या देत जनतेच्या आवाजाला अधिक बळ दिले. पत्रकारांचे आभार उल्हास नदी बचाव समिती, स्थानिक पर्यावरणप्रेमी, सर्व पूरग्रस्त नागरिकांकडून मान्यता आले