Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी वर्ग अनुदानापासून वंचित, जिल्हाधिकारी साहेब आता तरी लक्ष द्याल का?


अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके 

अंबड तालुक्यातील गेल्या सहा महिन्यापासून हस्तपोखरी येथील शेतकऱ्यांच्या नावाने अनुदान प्राप्त झाले आहे,मात्र तलाठी आणि कृषी सहाय्यक शेतकऱ्यांच्या अनुदान देण्यासाठी दिरंगाई करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये रोष असून कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे, यामुळे शेतकऱ्यांमध्ये तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या समन्वय नसल्याने अद्यापही शेतकऱ्याच्या खात्यात अनुदान जमा झालेले नाही हस्तपोखरी येथील शेतकऱ्यांना अजून अनुदानपासून वंचित आहे