Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थी पटसंख्या वाढीसाठी नारंगी ग्रामपंचायतचा उपक्रम अनुकरनिय-आ.महेंद्र दळवी यांच्या शाळागृह उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन



 अलिबाग (रत्नाकर पाटील)

रायगड जिल्ह्यात विद्यार्थीपट संख्या अभावी जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या समस्या समोर येत असतानाच, आपल्या गावातील विद्यार्थी शिक्षणास वंचित राहू नये याकरता नारंगी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती आणि नारंगी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शिशुवर्गाची सुरुवात केली आहे. हा प्रयत्न केवळ स्तुत्य व कौतुकास्पद नव्हे तर जिल्ह्यात अनुकरणीय उदाहरण आहे असे प्रतिपादन अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे.

     नारंगी जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी पटसंख्या अभावी बंद पडू नये यावर तोडगा काढण्याकरता नारंगी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती आणि नारंगी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शिशु वर्गाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या शिशुवर्गासाठी बांधण्यात आलेल्या दोन नव्या वर्ग खोल्यांचा समावेश असलेल्या इमारतीचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आमदार दळवी बोलत होते.

   यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अँड. आस्वाद पाटील, माजी जि प सदस्य मानसी ताई दळवी, डॉ.चित्रा पाटील, समीरा हेबिटेट चे व्यवस्थापक संचालक समीर नेरुळकर, नारंगी ग्रामपंचायत सरपंच उदय म्हात्रे, शिरवली ग्रामपंचायत सरपंच प्रनिकेत म्हात्रे, चिंचवली ग्रामपंचायत सरपंच राजाभाऊ गावंड,डॉ. जगन्नाथ पाटील, चंद्रकांत मोकल,नयना पिमेंटा आदी मान्यवर उपस्थित होते.

 सरपंच उदय म्हात्रे यांनी सांगितले की शिशुवर्गाच्या इमारतीच्या बांधकामा करता समीरा हॅबिटॅटने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अर्थसहाय्य केले आहे. दरम्यान शाळेची विद्यार्थी पटसंख्या वाढवा याकरता या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय ग्रामपंचायतिने घेतला  असल्याचे सरपंच उदय मात्र यांनी सांगितले.