विद्यार्थ्यांचा मोफत विमा व पालकांना घरपट्टी व पाणी पट्टी माफ
देगलूर: तालुक्यातील चालुक्य कालीन नगरी येरगी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता 8 वी पर्यंत शाळा असून येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात.दिनांक 1 जून 2025 रोजी ग्रामपंचायत मध्ये सर्वानुमते एक ठराव घेण्यात आला. त्यात गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचा एक वर्षाचा विमा ग्राम पंचायत कार्यालय कडून काढून दिले जाणार आहे,तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांच्या घरची वार्षिक घरपट्टी आणि पाणी पट्टी पूर्ण माफ करण्यात येणार असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी ,मुलांमध्ये शाळेची ओढ निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती सरपंच संतोष पाटील यांनी सांगितले.सदरील ठरावास सुचक विश्वनाथ बागेवार तर अनुमोदन अशोक वाघमारे यांनी दिले.
यावेळी उपसरपंच मारुती तलारवार ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ बागेवार, अशोक वाघमारे, अशोक बरसमवार, सुरेश सोमवार, पुंडलिक वाघमारे गजानन सुर्यवंशी सचिव राजेश तोटावाड, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष गजानन भोकसखेडे, तंटामुक्त अध्यक्ष सायलू कांबळे, आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळेचे भवितव्य टिकवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल.या निर्णयामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अधिक बळकट होऊन गावकऱ्यांमध्ये शिक्षणासाठी सकारात्मक वातावरणनिर्माण होईल अशी अपेक्षा आहे.-संतोष पाटील ग्रामपंचायत कार्यालय येरगी
Social Plugin