पुल नसल्यामुळे वाहत्या पाण्यातून शेतकर्यांना करावा लागतो जीवघेणा प्रवास.
टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथे शेतकर्यांना शेतात येण्या जाण्यासाठी खंडोबाचा ओढा ते शिराळा बुटखेडा या रस्त्यावर पुल नसल्याने शेतकर्यांना पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून वाट शोधावी लागत आहे. या खंडोबाच्या ओढ्या पलीकडे अणेक शेतकर्यांची जमीन आहे. तसेच हा अकोलादेव, बुटखेडा शिराळा हा जुना जवळचा मार्ग असल्याने अणेक शेतकरी, शेतमजूर,नागरीक येजाय करीत असतात. पावसाळ्यात हा ओढा दुथडी भरून वाहत असतो. याच पुराच्या पाण्यातून शेतकर्यांना पाण्यातून येजाय करावी लागते. या ओढ्यावर पुल बांधण्यासाठी शासन दरबारी अणेक वेळा मागणी करून सुध्दा प्रशासनाला अजून पाझर फुटायला तयार नाही. सन २०१३ मध्ये याच ओढ्याच्या पाण्याच्या प्रवहात चार महीला वाहून जात असतांना अकोलादेव येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे या महीलांचे प्राण वाचले होते.
यावेळी तत्कालीन तहसीलदार यांनी पाहणी करून येथे पुल तयार करावा यासाठी शासनाला कळविले होते. पण प्रशासनाने या घटनेला गांभीर्याने घेतले नाही. तात्पुरतते नळकांडी टाकून मोकळे झाले होते. दुस-याच वर्षी हे नळकांडे वाहून गेले. अद्यापही हा पुलाला मंजुरी मिळाली नाही. हा पुल मंजुर व्हावा यासाठी गटशेती प्रमुख लक्ष्मण सवडे, चेअरमन गणेश बापु सवडे, माजी पंचायत समिती सदस्य दादाराव पाटील सवडे, माजी सरपंच रघुनाथ कदम,यांच्यासह शेतक-यांनी केली होती. पण माञ या रास्त मागणीला निबरगठ्ठ अधिका-यांनी केराची टोपली दाखवली. शासन अजून किती पुराच्या पाण्यात वाहून जाणा-यांची वाट पाहणार आहेत का?असा सवाल शेतकरी करीत आहेत.
सदरील शेत रस्त्यावर अनेक दिवसापासून शेतकरी पुलाची मागणी करत आहे पण या मागणीकडे कोणीही लक्ष देत नाही १२ वर्षांपूर्वी याच ओढ्यात महिला वाहून जाताना शांताबाई पाटोळे यांनी त्यांचे प्राण वाचवले होते. शासन व्यवस्था जर या ठिकाणी काही दुर्घटना झाल्यावरच पुलाचे काम मनावर घेणार तर नक्कीच ही व्यवस्था गेंड्याच्या कातडीची झाली अस म्हणायला हरकत नाही.शासनाच्या संबंधित विभागाने लवकरात लवकर दखल घेऊन या पुलाचे काम तत्काळ करून शेतकऱ्यांची होणारी तारांबळ आणि कसरत थांबवावी.-समाधान हारी सवडे नागरीक अकोलादेव
आम्ही अणेक वर्षा पासून हा पुल बांधण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. व तत्कालीन तहसीलदार जाफराबाद यांनी ही घटना शासनाकडे कळून सुध्दा उपयोग झाला नाही-चेअरमन गणेश बापु सवडे.
अकोलादेव ते बुटखेडा,शिराळा या रस्त्याला क्रमांक मिळाला असून शासनाने या रस्त्याला मंजुरी देऊन तात्काळ पुलाचे व रस्त्याचे काम चालु करावे. -पंचायत समिती सदस्य दादाराव पाटील सवडे
Social Plugin