निचपूर ,राजगड,सिंदगी,मोहपूर, कनकवाडी,बोरगाव व इतर गावात मोठे नुकसान झाले आहेत तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी भाजपा कार्यकर्ते महेश मुंडे यांनी केली अचानक आलेल्या चक्री वादळ मुळे जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे निचपूर येथील असलम शेख यांच्या घरावरची पत्रे व शेतकऱ्याचे सौरऊर्जा पॅनल कोसळून मोठे नुकसान दिनांक 10.06.2025 रोजी सायंकाळच्या सुमारास परिसरात आलेल्या जोरदार चक्री वाऱ्यामुळे निचपूर ,राजगड,सिंदगी,मोहपूर, कनकवाडी,बोरगाव व इतर गावात मोठे नुकसान झाले आहेत त्यात शेतकरी श्री. विठ्ठल सखाराम लहाने यांच्या शेतात लावलेले सौरऊर्जा पंपाचे पॅनल पूर्णपणे कोसळून नुकसान झाले आहे. तर वैजनाथ मुंडे यांच्या शेतात सागवान वृक्ष मोठ्या प्रमाणात पडून शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसते
श्री. विट्ठल लहाने यांनी शासनाच्या कुसुम योजनेंतर्गत G K Energy Marketers Pvt. Ltd. या कंपनीमार्फत 5 HP क्षमतेचा सौर पंप बसवला होता. मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे पॅनलची लोखंडी फ्रेम तुटून खाली कोसळली असून सर्व सर्व प्लेट मोडून पडल्या आहेत. संपूर्ण यंत्रणा कार्यक्षमतेच्या बाहेर गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेची गावातील माननीय सरपंच व पंच उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून, बऱ्याच शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. असे महेश मुंडे यांनी सांगितले आहे लवकरच विमा कंपनीकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज सादर करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. भाजपा कार्यकर्ते महेश मुंडे यांनी सर्व शेतकऱ्यांना धीर देत लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानभरपाई मिळवून देण्याचे शासन दरबारी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले
Social Plugin