योग कोणी कधी कसा करायचा या बाबतीत बऱ्याच शंका कुशंका आपल्या मनात घर करून आहेत. त्यामुळे आजच्या जागतिक योग दिनानिमित्त माझ्या माहिती नुसार लिखाणाचा प्रयत्न करीत आहे. आजच्या धकाधकीच्या युगात विध्यार्थी मानसिक ताण, अभ्यास करताना होणारा त्रास, परिक्षेची भिती जिवघेन्या स्पर्धा पालकांच्या अपेक्षा, शिक्षण पद्धती मधे होणारे बदल या आणि अशा प्रकारच्या बऱ्याच समस्या ना झुंज देत देत विद्यार्थी स्वतः चे व्यक्तीमत्व विकसित करत असतो. त्यांच्या या प्रवासात 'योग'रुपी नवका त्याला पैलतीरावर नेऊ शकते यात तिळमात्र शंका नाही .विध्यार्थ्यांना योग अमुल्य पथदर्शक ठरू शकते. हे मी योग अभ्यासक म्हणून निरिक्षणाती सांगु शकतो. विध्यार्थ्यांना सर्वांग विकासासाठी अत्यावश्यक आहे.
#योग म्हणजे केवळ आसन नाही तर तो स्वतः मधील चैतन्याला फुंकर घालण्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे योग म्हणजे नुसते शरीराला वाकवणे नाही तर तो मन,बुद्धी, अवयव आणि श्वास यांच्यामधील समन्वय आहे.
विध्यार्थ्यांना योगाचे फायदे.
(१)एकाग्रता वाढते. ध्यान आणि प्रणायामामुळे मन शांत होते स्मरण सुधारणा होते.
(२)तणावमुक्त जिवन.स्पर्धा आणि वातावरणात होणाऱ्या बदलामुळे मानसिक ताण पडतो त्यामुळे २० ते २५ मिनिटे केलेल्या योगा मुळे शारिरीक व मानसिक ताण कमी होतो.(३)शरीरात बदल होतो.आजच्या जिमच्या व्यायाम प्रकारामुळे पैसा खर्च करून सुधा जो परिणाम दिसत नाही तो योग केल्यास शरीरात विस्मयकारक बद्दल होतात बऱ्याच शारीरिकव्याधि योगाच्या नियमित सरावाने ठिक होतात.
(४)जिवनमानात सुधारणा. शरीराला योग्य आहार,शिस्त,संयम,वेळेचे नियोजन करणे, यामुळे सकारात्मक बदल होतो ते वातावरण अभ्यास करताना फायदेशीर ठरते
(५)शिक्षण आणि संस्कार. आजच्या काळात अनेक समस्याना समोरे जात असताना शिक्षणापेक्षा संस्कार महत्त्वाचे ठरतात. कारण चांगल्या शरीरात चांगले मन वास करते.आणि वरीलपैकी सर्व बाबींचा समावेश सुंदर, स्वच्छ, सुदृढ, सविनय माणूस निर्माण करण्यासाठी होतो त्यामुळे आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये योगाचा समावेश करणे आगत्याचे आहे.
(६)विध्यार्थीना शालेय जीवनात आरोग्य सेवा गरजेची.मन व शरीर दोन्ही ठिकठाक असेल तर शिकवल्या जाणारा प्रत्त्येक विषय आकलन होईल.त्यामुळे योग आपल्या जीवनातील एक भाग म्हणून करणे गरजेचे आहे.त्यामुळे योग ची अमलबजावणी शालेय जीवनात होणे आवश्यक आहे.कारण आजचा विध्यार्थी भविष्यातील भारताचे आधारस्तंभ आहेत.
(७)मोबाईल आणि टि.व्हि चा विळख्यातुन विध्यार्थ्यांना बाजूला ठेवन्या करता योग सराव अत्यंत आवश्यक आहे पालक मुलांसमोरच तासंतास मोबाईल चा वापर करतात तोच काही वेळ योग करण्यात घालवला तर मुलांना मोबाईल पासुन सहज दुर ठेवता येईल त्यामुळे बऱ्याच समस्या निर्माण होणार नाही.
आता येव्हडेच.जागतिक योग दिनानिमित्त सर्वांना निरामय शुभेच्छा.
रमेश तळेकर सर
शिक्षक तथा योग
शिक्षक सहकार विधा मंदिर
देऊळगाव मही
Social Plugin