Ticker

6/recent/ticker-posts

चिंचोटीचे ग्रामस्थ पितात किडे पडलेल्या कुत्र्याचे दुर्गंधीयुक्त पाणी; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ



ग्रामपंचायतीच्या प्रशासक , ग्रामसेवका बरोबरच पाणी सोडणाऱ्या  विरोधात गुन्हा दाखल करण्याची  जिल्हा प्रशासनाकाडे तक्रार,,


अलिबाग(रत्नाकर पाटील)

चिंचोटी गावातील जलजीवन मिशन योजनेमध्ये बांधलेल्या नागरीक पित असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहीरीमध्ये कुजलेल्या, किडे पडलेल्या कुत्र्याचे दुर्गंधीयुक्त पाणी चिंचोटी ग्रामस्थांना दुषित पाणी प्यायची वेळ आलीय,

सदरचे दूषित घाणेरडे पाणी पाजणाऱ्या निलेश मनोहर ठाकूर, मनोहर सिताराम ठाकूर तसेच ग्रामपंचायत चिंचोटीचे प्रशासक, ग्रामसेवक यांच्याविरूध्द मानवी जिवीतास धोका पोहचवणे तसेच नागरीकांचे आरोग्य धोक्यात आणणे याबाबतीत भारतीय न्यायदंडसंहिता २०२३ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करणेबाबतची तक्रार गावचे प्रमोद पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी रायगड, पोलिस निरीक्षक रेवदंडा पोलिस ठाणे, तहसीलदार अलिबाग यांच्या कार्यालयात लेखी तक्रार करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे,

सदरच्या तक्रार अर्जामध्ये तक्रार करत की, आमच्या गावामध्ये नागरिकांच्या पिण्याच्या पाणी ज्या विहीरीतून सोडले जाते त्या विहीरीमध्ये कुत्रा पडून मरून तो कुजून त्यावर किडे पडलेले घाणेरडे पाणी आम्हा नागरीकांना पाणी सोडणारा कामगार निलेश मनोहर ठाकूर व मनोहर सिताराम ठाकूर हे विहीरीमध्ये कुजलेल्या, किडे पडलेल्या कुत्र्याचे आम्हा चिंचोटी ग्रामस्थांना दुषित पाणी मागील कित्येक दिवसांपासून जाणीवपुर्वक सोडत आहेत.

चिंचोटी गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी सोडण्याचे काम निलेश मनोहर ठाकूर व मनोहर सिताराम ठाकूर हे करीत आहेत. पिण्याचे पाण्याला घाणेरडा वास येतोय म्हणून गावामध्ये चर्चा सुरू झाली. गावातील लोकांनी सदरची बाब पाणी सोडणाऱ्या मनोहर ठाकूर यांच्या निदर्शनासही आणून दिली तरीही या मेलेल्या कुत्र्याकडे मनोहर ठाकूर यांनी लक्ष दिले नाही.ग्रामपंचायत चिंचोटीच्या ग्रामसेवकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क झाला नाही. विहीरीमध्ये कुत्रा पडून तो कुजून त्यावर किडे पडलेले घाणरेडे पाणी नागरीकांना प्यावे लागत आहे हे आमचे दुर्दैव आहे.

गावातील नागरीकांना पाणी देण्याच्या बाबतीत ग्रामपंचायत चिंचोटीने हात वर केल्यानंतर गावातील महिलांनी प्रत्येकी १०००/- वर्गणी काढून पाणी योजना सुरू करून निलेश ठाकूर व मनोहर ठाकूर यांना एकूण रक्कम रूपये १०,०००/- (दहा हजार रूपये) दर महिना पगार देतो. पगार घेवूनही हया दोघांनी विहीरीमध्ये मेलेल्या कुजलेल्या कुत्र्याचे पाणी नागरीकांना आजही पाजत आहेत.

सदरच्या घटनास्थळाचा आपण प्रत्यक्ष जागेवर येवून पंचनामा करून वस्तुस्थिती पहावी. आम्हा चिंचोटी ग्रामस्थांना अत्यंत नीचपणाचा कळस गाठून जे पाणी पाजले जात आहे. त्याचे माणूस म्हणून सदरच्या अर्जावर आपण कारवाई करावी.

 चिंचोटी गावातील जलजीवन मिशन योजनेमध्ये बांधलेल्या नागरीक पित असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहीरीमध्ये कुजलेल्या, किडे पडलेल्या कुत्र्याचे आम्हा चिंचोटी ग्रामस्थांना दुषित पाणी पाजणाऱ्या निलेश मनोहर ठाकूर, मनोहर सिताराम ठाकूर तसेच ग्रामपंचायत चिंचोटीचे प्रशासक, ग्रामसेवक यांच्याविरूध्द मानवी जिवीतास धोका पोहचवणे तसेच नागरीकांचे आरोग्य धोक्यात आणणे याबाबतीत भारतीय न्यायदंडसंहिता २०२३ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे,

पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा केला जातो, सदरच्या विहिरीमध्ये कुत्रा मरून त्यावर किडे पडून दुर्घधीयुक्त पाणी प्यावं लागते, मानवी जीविताला हानी पोहचवण्याचा हा एक प्रकारे गुन्हा आहे, त्यामुळे प्रशासनाने  संबंधीतावर तत्काळ गुन्हा दाखल करावा,--प्रमोद पाटील, तक्रारदार,