राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
मंत्रालय आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या वतीने जिल्ह्यात २९ मे ते १२ जून या काळात १५ दिवसांचे 'विकसित कृषी संकल्प अभियान' राबविले जात आहे. या निमित्त शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात असून कृषी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानासह नव्या पीकांची व योजनांची माहिती या अभियानातून शेतकऱ्यांना दिली जात आहे.
माहितीनुसार, या काळात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कृषी यात्रा काढली जात असून या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. या अंतर्गत शेतीविषयक समस्या व खरिप पिकाचे नियोजन या विषयावर संवाद साधला जात आहे. या निमित्ताने दिग्रस तालुक्यातील तूपटाकळी, वाईमेंढी, लाख रायाजी, कलगाव, डेहनी आणि कांदळी या गावांमध्ये कार्यक्रमाचे नियोजन कृषी विभाग आत्मा व कृषी विज्ञान केंद्र यांचे वतीने करण्यात आले होते. या अभियाना मध्ये तालुका कृषी अधिकारी दिग्रस की साक्षी आडे , आत्मा व्यवस्थापक सागर बोंडे तसेच मार्गदर्शक म्हणून केंद्रिय कापूस संशोधन केंद्र नागपूर येथील शास्त्रज्ञ डॉ. मनिकंन्दन सर तसेच कृषी विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे) येथील विषय विशेषज्ञ डॉ. विपुल वाघ (पीक संरक्षण), मयूर इंगोले (उद्यानविद्या), देवानंद राऊत (पशू संवर्धन), राहुल इंगोले (कार्यक्रम सहाय्यक मातीपरीक्षण). उपस्थित होते.
सदर कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया, मातीपरीक्षण, बियाणे उगवण क्षमता चाचणी तसेच सोयाबिन, कापूस, तूर, ऊस, हळद, संत्रा फळबाग लागवड, चारा पीक लागवड आणि खत व्यवस्थापन तसेच शेळी पालन या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सदर कार्यक्रमा मध्ये मंडळ कृषी अधिकारी दिग्रस यांनी कृषी विभागाच्या योजना विषयी माहिती दिली कार्यक्रमासाठी कृषी विभाग व आत्मा चे सर्व कर्मचारी यांच्या सह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin