प्रकाश राजेघाटगे
मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. घशाला कोरड पडत असल्याने रसवंतीगृहाच्या घुंगरांचा आवाज कानी पडू लागला आहे. त्यामुळे थंडगार उसाचा रस पिण्यासाठी प्रवासी व नागरिकांची पावले आपोआप रसवंतीगृहांकडे वळू लागली आहेत. मार्च,एप्रिल आणि मे हे तीन महिने उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये उसाला चांगली मागणी असते. उसाचा रस पिण्याकडे नागरिकांचा सर्वाधिक कल आहे. आरोग्यासाठी फायदेशीर उसाचा रस मधुमेहासाठीफायदेशीर असतो. शरीरातील ग्लुक ग्लुकोजची पातळी नियंत्रित करतो.उसाचा रस रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. वजन कमी करण्यास मदत करतो, उसाच्या रसामध्ये भरपूर फायबर असते.
उसाचा रस १५ ते २० रुपयांमध्येच पूर्ण व जम्बो ग्लास रस मिळत आहे. अनेक जणांना रसामध्ये वापरण्यात येणाऱ्या बर्फाची चिंता असल्याने विनाबर्फाच्या रसाची मागणी करतात. उसाच्या रसामध्ये लिंबू, अद्रक, अननसाचा वापर, यामुळे रसाची मागणी वाढली आहे. एका रसवंती चालकास रोज १०० किलो उसाची आवश्यकता असते. - राकेश शेवते काटेवाडी , विक्रेता
नागरिकांची पावले वळताहेत रसवंतीकडे
उन्हाळ्यात शीतपेयांना खूप मागणी असते. यामध्ये जास्त करून उसाचा रस व नारळपाणी पिण्यासाठी गर्दी होत आहे. लिंबू, आलेयुक्त उसाचा आयुर्वेदिक रस पिल्याने शरीराचे तापमान योग्य राखण्यास मदत होते. तसेच उन्हाळामुळे उसाचा रस पिण्यासाठी गर्दी होत आहे. विविधरंगी शीतपेयांची व सरबताची दुकानेदेखील रस्त्याकिनारी लागली असून, नागरिकांची पावले आपसूकच त्याकडे वळत आहेत. नीरा पिण्यासाठीही नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. परंतु, आरोग्याच्या दृष्टीने उसाच्या ताज्या रसाला अधिक मागणी आहे, त्यामुळे रसवंतगृहे गजबजली आहेत.





Social Plugin