बुध दि . (प्रकाश राजेघाटगे):
खटाव तालुक्यातील भोसरे येथील श्री हनुमान विद्यालयाचे सन १९८२-८३दहावी बॅचचे माजी विद्यार्थी यांचा रविवारी दिनांक १५ जून २०२५ रोजी सकाळी ८:१५ वाजता सर्व माजी विद्यार्थी, शिक्षक भोसरे येथील सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन श्री हनुमान मंदीरात जाऊन हार, फुले व श्रीफळ देऊन वंदन केले. त्यानंतर सर सेनापती प्रतापराव गुजर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून व दर्शन घेऊन श्री हनुमान विद्यालय मध्ये येऊन भूमिला सर्वांनी वंदन केले,त्यानंतर आनंद कृषी पर्यटन केंद्र बोरगाव येथे कार्यक्रमास सुरुवात झाली, व्यासपीठावर प्रमुख पाहुणे खाडे सर, सानप सर,बोर्गे सर,मगर सर, अरुण काकडे आदी मान्य वर व्यासपीठावर स्थानापन्न झाले.
जे विद्यार्थी,विद्यार्थिनी शिक्षक आज आपल्या नाहीत,तसेच नुकताच विमान अपघात जे मरण पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंतराव देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी अरुण काकडे यांनी निरोगी आयुष्य राहण्यासाठी सकाळी चार किलोमीटर चालले पाहिजे असे सांगितले, तसेच सुरेखा जाधव यांनी सांगितले की जरशी गायी पेक्षा देशी गाईचे संगोपन करावे, त्याचबरोबर आरोग्यासाठी योग्य मार्गदर्शन केले. तर शशिकला गुजर यांनी घर सांभाळून नोकरी कशी केली आहे,याचा अनुभव सांगितला.
या कार्यक्रमासाठी आलेल्या भगिनींना साडया व ट्रॉफी देण्यात आली. बंधू मित्रांना ट्रॉफी व पॉकेट देण्यात आले.सर्व जण ४२ वर्षानी एकत्रित भेटल्याने एकमेकांविषयी आपुलकीने विचारपूस करुन केक कापून आनंद उत्सव साजरा केला,हा स्नेहसंमेलन कार्यक्रम होण्यासाठी मारुती थोरात, विष्णू कदम, प्रवीण रणपिसे, प्रल्हाद मदने, सतीश गायकवाड, बळवंतराव देशमुख, प्रकाश माने यांनी हा मेळावा होण्यासाठी प्रयत्न सर्वांना एकत्रित करुन कार्यक्रम यशस्वी केला,तर राहुल कोळी यांनी सुत्र संचालन करून नवीन व जुनी गाणी गाऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली.तर विश्वंभर ननावरे यांनी आभार प्रदर्शन करुन कार्यक्रमाची सांगता केली,
Social Plugin