Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा मानोरा मतदार संघाच्या आमदार सईताई डाहाके शेतकऱ्याच्या बांधावर नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 


कारंजा(लाड ) मागील दोन आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील भुईमुंग पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे सर्वेक्षण करावे असे निर्देश आमदार सईताई डहाके यांनी दिले आहेत. अवकाळी पावसामुळे भुईमुग व इतर पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणत झाले आहे त्याची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश दिले व नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळण्याचे आश्वासन दिले.

मागील १४ मे पासून कारंजा शहर आणि तालुक्यात कमी, जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे किनखेड येथील शेतकऱ्यांनी मागील रब्बी हंगामात घेतलेल्या भुईमुंग पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे काढणीला आलेला भुईमुंग त्यांना काढणे शक्य झाले नाही. परिणामी भुईमुंग पिक आ. सईताई डहाके यांनी दिले पंचनाम्याचे निर्देश जमिनीतच खराब झाले. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून आमदार सईताई डहाके यांनी २९ मे रोजी किनखेड येथे भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील भुईमुंग पिकाची पाहणी केली. तसेच त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर महसूल विभागाला तातडीने नुकसानग्रस्त भुईमुंग पिकाचे पंचनामे करावे असे निर्देश दिले. तसेच शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले. यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. राजीव काळे, कृषी सहाय्यक, नायब तहसीलदार यांच्यासह गावकरी तथा नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होती