तक्रारदार,निवेदनकर्त्यांसोबत साधला संवाद
राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : दिग्रस तालुक्यातील प्रलंबित तक्रारीचा पालकमंत्री संजय राठोड यांनी आज आढावा घेतला, तक्रारदार, निवेदनकत्यासोबत संवाद साधत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तेथेच संबंधित अधिकान्यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी उपवनसंरक्षक डॉ. बी. एन. स्वामी, उपविभागीय अधिकारी आशीष बिजवल, बांधकामचे कार्यकारी अभियंता महेश माथूलकर, तहसीलदार मपूर राऊत, गटविकास अधिकारी खरोडे, नगरपरिषद मुख्याधिकारी अतुल पंत, उपविभागीय कृषी अधिकारी एस. एच. गोसावी, तालुका कृषी अधिकारी एस. एस. राजपूत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशीष पवार, अरुणावती प्रकल्पाचे साहाय्यक अभियंता अखिल चव्हाण, जलसंधारण अधिकारी प्र. ह. सैनी यांच्यासह उपविभाग व तालुकास्तरीय सर्व अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री कार्यालयाकडे ऑनलाइन दाखल झालेल्या, परंतु विभागांद्वारे त्यावर वेळेवर योग्य कार्यवाही न झालेल्या तक्रारी, निवेदनांवर पालकमंत्र्यांनी तक्रारदारांसमक्ष विभागांसोबत चर्चा करून कालमयदित योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले.
यावेळी पालकमंत्र्यांनी जवळजवळ ५० पेक्षा अधिक तक्रारदार, निवेदनकल्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्या तक्रारी समस्याजाणून घेतल्या.भजनी मंडळांना साहित्य, घरकूल निधी हप्ता, सुरळीत पाणीपुरवठा, नाला खोलीकरण व रुंदीकरण, अतिक्रमण जमिनीवर घराचे बांधकाम, नवीन विहीर, बँकेद्वारे परस्पर रकमेची कपात, स्मशानभूमीसाठी जागा, रस्ता, योग भवन बांधकाम, ग्रामसभा नियमित घेतली जात नाही, पांदण रस्त्यांची दुरुस्ती, अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती, स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल, सातबारावर क्षेत्र दुरुस्तो, अतिक्रमण जागेवरील बांधकाम थांबविणे, वीज कनेक्शन, लिंगा वाई येथे विकासकामे, सभामंडपाचे बांधकाम, टिनशेड बांधकाम आदी विषयांवरील प्राप्त तक्रारी, निवेदनावर कारवाईच्या पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
Social Plugin