Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक व व्यावहारिक शिक्षण गरजेचे - संतोष जाधव सर



कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी 


जालना: सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ कार्यालयात कौशल्य व व्यावहारिक शिक्षण या वर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाचा प्रसंगी नियमित शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना सर्वसामावेशक कौशल्य व व्यावहारिक शिक्षण गरजेचे आहे  असे प्रतिपादन संतोष जाधव यांनी केले. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ आयोजित दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले शिक्षणाबरोबर कौशल्य हे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी व्यवहारिक, व्यावसायिक शिक्षण घेतले पाहिजे.  

शिक्षण हे स्टेटस नाही तर ते शिक्षण घेतल्याने आपले जीवन आनंदी झाले पाहिजे. चांगलं शिक्षण घेणे म्हणजे यश नसून त्या शिक्षणातून आनंदी जीवन जगणे म्हणजेच यश होय.  विद्यार्थ्यांनी संधी बघत बसू नये  तर संधी तुमच्या समोर आहे व त्यावर काम केले पाहिजे.  प्रत्येकामध्ये काही ना काही कौशल्य असते ते ओळखून त्या पद्धतीचे शिक्षण घेऊन त्यामध्ये व्यवसाय, नोकरी करावी. प्रत्येक विद्यार्थ्यांनी संघर्षाची तयारी ठेवावी कारण संघर्षाशिवाय यश येत नाही.  यावेळी उपस्थित सपनाजी गोयल यांनी विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विविध कोर्सेस  व संधी या विषयात सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भानुदास दोबाले यांनी सूत्रसंचालन राजू वाघमारे तर आभार प्रदर्शन डॉ. अमित हजारे यांनी केले. यावेळी महेश बळक, रघुनाथ नायकवडे यांच्यासह शहरातील विविध सेवा वस्तीतील  विद्यार्थी व पालक उपस्थित होते.