शिरुर ग्रामीण प्रतिनीधी - (शैलेश जाधव)
शिरुर शहरातील भुमीपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या भावना शब्दबद्ध करत एक हृदयस्पर्शी लेख लिहिला आहे.या लेखातून त्यांच्या मनातील राजसाहेबांविषयीची निष्ठा, प्रेम आणि आदर प्रभावीपणे व्यक्त होतो.
कुटे यांनी लिहिलंय की –"शालेय जीवनाच्या शेवटच्या उंबरठ्यावर असताना, जेंव्हा सोशल मिडिया नावाची गोष्ट फारशी प्रभावी नव्हती, तेंव्हा अनेकांच्या मोबाईलमध्ये राजसाहेबांचे भाषण आणि फोटो हमखास असायचे. तरुणाई अक्षरशः बेफाम होऊन सभांना गर्दी करायची."राजकारणात कोणताही रस नसताना फक्त राजसाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन, कुटे यांचा प्रवास एक सामान्य विद्यार्थी कार्यकर्ता ते विद्यार्थी आघाडीत सक्रिय पदाधिकारी, आणि आज भुमीपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष असा झाला आहे.
त्यांच्या मते, "या प्रवासात संघटनेत काम करताना पद मिळालं हे समजायलाही वेळ लागला नाही. पण जसं राजकारण समजायला लागलं, तसं या विचाराशी नाळ अजून घट्ट होत गेली.राज ठाकरे हे एक नुसतं व्यक्तिमत्त्व नाही, तर विचार आहेत. हे मत सुशांत कुटे वारंवार आपल्या शब्दांतून अधोरेखित करतात.ते म्हणतात –"आजही त्यांच्या एका शब्दावर कार्यकर्ते काहीही करायला तयार होतात. ही प्रेरणा, ही भावना, हे नेतृत्व – दुसऱ्या कोणत्याही नेत्याच्या नशिबी नाही.
कुटे स्पष्टपणे सांगतात की,राजसाहेबांच्या संघटनेला संपली-संपली म्हणणारे विरोधकही आज त्यांच्या भेटीसाठी शिवतीर्थाचे उंबरे झीजवत असतात. हे सत्य आहे, आणि कोणताही सुजाण नागरिक हे नाकारू शकत नाही.आज राजसाहेब वयाची ५६ वर्षं पूर्ण करत आहेत, आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने कुटे यांनी एका ओळीत सर्व सार सांगितलं आहे माय मराठीवर प्रेम करणारा, महाराष्ट्रधर्मासाठी लढणारा दुसरा असा नेता या छप्पन वर्षांत महाराष्ट्राने पाहिलेला नाही.
लेखाच्या शेवटी कुटे यांनी एक भावनिक पण ठाम प्रार्थना केली आहे –सत्ता, विरोध, निवडणुका या सगळ्या गोष्टी अल्पकालीन आहेत... पण महाराष्ट्राच्या मनामनात राज ठाकरे नावाचा विचार कायम टिकून राहावा, हीच आई जगदंबे चरणी प्रार्थनाहा लेख केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छा नव्हे, तर एका विचारप्रवाहित कार्यकर्त्याच्या अंत:करणातून निघालेला प्रामाणिक स्वर आहे.
Social Plugin