Ticker

6/recent/ticker-posts

नियोजन समितीच्या बैठकीत महावितरणाच्या मनमानी कारभारावर आमदार अंतापुरकर यांचा हल्लाबोल.

 



 प्रतिनिधी गणेश कदम. 

बिलोली नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आ. जितेश अंतापूरकर यांनी आपल्या आक्रमक शैलीत मतदारसंघातील ज्वलंत समस्या मांडत प्रशासन आणि संबंधित विभागांच्या ढिसाळ कारभारावर कठोर शब्दांत टीका केली.

आ. अंतापूरकर यांनी महावितरणच्या मनमानी कारभारावर थेट हल्लाबोल करत हिंगणी, खुतमापूर, खतगाव, वन्नाळी, रामतीर्थ या गावांतील झालेल्या दुर्घटनांबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. महावितरणचे नियोजन ढिसाळ असून, त्यांच्या निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहेङ्ग अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच २०२३ मध्ये ऑफलाईन पद्धतीने पिकविमा भरलेल्या १५५६ शेतकऱ्यांना आजतागायत विमा मिळालेला नसल्याचे स्पष्ट करत तात्काळ मतदार संघातील ढिसाळ नियोजन, बोगस बियाणे, पिकविमा आणि आरोग्यसेवा, आधार केंद्र यांसह अनेक मुद्यांवर आ. अंतापुरकरांनी प्रशासनाला जाब विचारला. महावितरणच्या प्रश्नांवर आ. अंतापुरकर आक्रमक झाल्यानंतर खा. अशोकराव चव्हाण व आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्या प्रश्नांची दखल घेत प्रशासनाला धारेवर धरले.

विमा वाटप करण्याची मागणी त्यांनी केली. बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांना दूबार पेरणी करावी लागत आहे. संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी त्यांनी लावून धरली व आरोग्यसेवेच्या बाबतीतही आ. अंतापूरकरांनी गंभीर चिंता व्यक्त केली. देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील ९ कर्मचारी प्रतिनियुक्तीवर असल्यामुळे रुग्णांना योग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे ही प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.