Ticker

6/recent/ticker-posts

किर्तन कार कांचन ताई शेळके यांच्या किर्तनाला प्रतिसाद



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 

कारंजा (लाड )मल्हार राजे गृप मित्र मंडळाच्या वतीने ३१ मे रोजी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमीत्त हभप कांचन ताई शेळके यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कीर्तनाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार श्रीमती सईताई प्रकाशदादा डहाके उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांचा यथोचित सत्कार मल्हार राजे गृप मित्र मंडळाचे वतीने करण्यात आला. यानंतर हभप कांचनताई शेळके यांचे किर्तनाचा कार्यक्रम झाला.

यावेळी त्यांनी आपल्या किर्तनातून सांगितले की, स्वप्न मोठं मोठे पाहतो पण तेवढे पंख देतो का? आपल्या मुलामुलींना गिफ्ट द्यायचे असेल तर पुस्तके वाचायला द्या. त्यांना मोबाईलपासून दूर ठेवा. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, कर्म केले ते भोगावे लागेलच यातून कुणाचीही सुटका नाही. आपल्या मुला बाळांच्या चुका आपण झाकतो. मुलाला चांगले

संस्कारीत करण्यासाठी अपराधावर पांघरूण घालू नका. स्त्री हट्ट व बाल हट्ट पुरवावेच लागते पण स्त्रीने व मुलांनी हट्ट करताना तुटेल ऐवढे ताणू नये. पैसा कमावण्यामध्ये प्रत्येकजण व्यस्त आहे. आपल्या मुला बाळावर लक्ष देण्यास वेळ नाही. संतती चांगली असेल तर कुंटुंबात, कुळात सात्विकता येईल. मुलींना आत्मरक्षणाचे शिक्षण द्या. प्रत्येक स्त्रीने सितेसारखे व्हा. वेळप्रसंगी महाकाली बना. मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा. इतिहास घडवायचा असेल तर तसे संस्कार द्यावे लागेल. जुन्या काळात सती गेली नाही तर मोक्ष मिळणार नाही अशी प्रथा अहिल्यादेवींनी बंद करून विधवा विवाहाला मान्यता दिली. त्यांनी अनेक मंदीरांचा जीर्णोद्धार केला, नद्यांवर घाट बांधलेत, प्रजेच रक्षण करणे हा प्रथम धर्म समजून विरोधकाला सामोरे गेल्या. अडल्या नडल्यांना सहकार्य केले