Ticker

6/recent/ticker-posts

वृक्ष लागवडीतून पर्यावरण संरक्षण साधने ही काळाची गरज - डॉ नितीन गांधी



विविध सामाजिक संस्थेकडून नेहुली खंडाळे येथे एकत्रितरित्या वृक्ष लागवड

अलिबाग(रत्नाकर)

उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था खंडाळे अलिबाग अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव यांच्या संकल्पनेतून व विशेष पुढाकारातून सर्व सामाजिक संस्थांना सोबत घेऊन साईबाबा मंदिराच्या प्रांगणात खेळीमेळीच्या वातावरणात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.   याप्रसंगी विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे यांची  लागवड करण्यात आली.यावेळी वृक्षारोपण कार्यक्रम मध्ये जन शिक्षण संस्थान रायगडचे सन्माननीय अध्यक्ष  अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, माणुसकी प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान जन शिक्षण संस्थान चे संचालक डॉ. विजय हिरामण कोकणे, जे. एस. एस. च्या उपाध्यक्ष सौ रत्नप्रभा बेल्लेकर , अँटीकरप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया चे महाराष्ट्र अध्यक्ष धनंजय म्हात्रे, लायन्स क्लब ऑफ डायमंड अध्यक्षा रेखा म्हात्रे, पंजाब नॅशनल बँक चे मॅनेजर अविनाश आलते, चेंढरे ग्रामपंचायत उपसरपंच म्हात्रे , वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष सौ आशा कोकणे, रायगडभूषण राऊत सर, आर.सी.एफ ऍडमिनिस्ट्रेटर अभय घरत, साई मंदिर खंडाळे येथील गुरव  प्रकाश पानसरे गुरुजी, रायगड जिल्हा परिषद कुष्ठरोग आरोग्य विभाग समन्वयक भगवान जाधव, उज्ज्वल भविष्य समन्वयक सचिन गोंधळी तसेच विविध सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, खंडाळे ग्रामस्थ मंदिरातील भक्तवर्ग उपस्थित होते. साईबाबा संस्थान कडून पानसरे गुरुजी यांनी आलेल्या सर्व मान्यवरांना शाल व श्रीफळ देऊन आशीर्वाद दिला. या वृक्ष लागवड मुळे मंदिरात परिसरात नेहमीच फुले व फळे उपलब्ध राहतील आणि येणाऱ्या भक्तगणांना सावली मिळेल असे जन शिक्षण संस्थांन चे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी यांनी सांगितले. तर डॉ विजय कोकणे यांनी जे.एस.एस रायगड च्या माध्यमातून पर्यावरण पूरक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उपक्रम व कार्याची माहिती दिली 

फक्त वृक्षारोपण न करता त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे असे उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेचे अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव यांनी सांगितले व ज्यांनी आज वृक्षारोपण केले त्यांनी पुढील तीन वर्ष तरी  झाडाचे संगोपन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.झाडं लावणं म्हणजे केवळ मातीमध्ये बीज रोवणं नाही, तर ती निसर्गाशी जोडलेली जबाबदारीची जाणीव आहे. उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था आधास्तंभ, माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी मत व्यक्त केले वम्हणाले की दरवर्षी 16 जून ला वृक्षांचे वाढदिवस आपण एकत्र येऊन साजरा करू.अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया चे महाराष्ट्र अध्यक्ष धनंजय म्हात्रे  यांनी वृक्षांचे सामाजिक महत्त्व विशद केले.