शिरुर ग्रामीण प्रतिनीधी - (शैलेश जाधव)
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या यशस्वी कारवाईनंतर संपूर्ण देशभरात उसळलेल्या राष्ट्राभिमानाच्या लाटेचा अनुभव शिरूर शहरानेही घेतला. विविध सामाजिक, राजकीय संघटनांच्या पुढाकाराने “तिरंगा पदयात्रा”चे भव्य आयोजन करण्यात आले. पावसाच्या सरींमध्येही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत, “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” अशा घोषणांनी शिरूर शहर देशभक्तीने गाजवले.
पदयात्रेला बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली. जुना पुणे-अहिल्यानगर महामार्गे मार्गक्रमण करत ही यात्रा हुतात्मा स्मारक चौकात पोहोचली. येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २८ पर्यटक व शहीद जवान यांना सामूहिक अभिवादन करण्यात आले
उल्लेखनीय मान्यवरांची उपस्थिती:
भाजपाचे जिल्हा नेतेनोटरी धर्मेंद्र खांडरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, श्रीराम सेनेचे सुनील जाधव युवासेना अध्यक्ष स्वप्निल रेड्डी, बजरंग सेनेचे जिल्हाध्यक्ष उमेश शेळके,भगवान शेळके,श्रीकृष्ण उद्योग समुहाचे सागर नरवडे, विघ्नहर्ता उद्योग समुहाचे अविनाश जाधव, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा ,प्रिया बिरादार,संदीप गायकवाड,गणपतराव फराटे,माजी सैनिक महादेव घावटे,मेजर नामदेवराव घावटे,पाटीलबुवा पाचर्णे,नितीन थोरात,केशव लोखंडे,विजय नरके,निलेश नवले,हर्षद ओस्तवाल,कैलास सोनवणे,मितेश गादिया,बाळू महाराज जोशी या प्रसंगी बांधकाम व्यावसायिक राजेंद्र दत्तात्रय देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रेरणादायी भाषणांचे ठळक मुद्दे:
🔹 *माजी कॅप्टन प्रभाकर थेउरकर* –
> “ऑपरेशन सिंदूर बंद नाही, फक्त स्थगित आहे. युद्ध अधिक तीव्र झाले असते, तर पाकिस्तान नकाशातून गायब झाला असता!”
🔹 *राष्ट्रपतींचे माजी अंगरक्षक माजी सैनिक विठ्ठल वराळ* –
> “हा बदललेला भारत आहे – जो प्रत्युत्तर देतो तेही अचूक आणि निर्भीड पद्धतीने!”
🔹 *धर्मेंद्र खांडरे* –
> “भारतीय लष्कराने केवळ ९० मिनिटांत पाकिस्तानला जबरदस्त धडा शिकवला. देश कोणताही असो – दहशतवादाला आता भारताकडून जागतिक उत्तर मिळणार!”
🔹 *राहुल पाचर्णे* –
> “ऑपरेशन सिंदूर ही एक ऐतिहासिक विजयगाथा आहे. ही पदयात्रा आमचे लष्कराच्या प्रति कृतज्ञतेचे प्रतीक आहे.”
🔹 *हाफीज बागवान* –
> “भारतीय सेनेच्या शौर्यावर सर्व भारतीयांना अभिमान आहे. हे केवळ सैन्याचे नव्हे, तर जनतेचेही यश आहे.”
एक तेजस्वी देशभक्तीचा क्षण...
शेकडो तिरंगे, घोषणांचा निनाद आणि देशासाठी धडपडणाऱ्या नागरिकांची उपस्थिती – “तिरंगा पदयात्रा”ने शिरूरच्या इतिहासात एक सोनेरी पान लिहिले. लष्कराविषयी अभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जनमानसात अधिक दृढ झाली आहे.
---





Social Plugin