जिल्हा प्रतिनिधी गणेश कदम.
जिल्हा नियोजन समिती आणि स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून वझरगा ता. देगलूर जि. नांदेड येथे मन्याड नदीतील जलसंधारण व पूरस्थिती टाळण्यासाठी सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामाची पाहणी पालकमंत्री अतुल सावे यांनी केली. या उपक्रमामुळे पाणीसाठा वाढेल, पुराचा धोका कमी होईल, तसेच शेतकऱ्यांची पिके देखील अधिक सुरक्षित राहू शकतील. यांच्यासोबत नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पदाधिकारी उपस्थित होते.





Social Plugin