प्रसाद दिनकरराव/ग्रामीण प्रतिनिधी
ठाणे: मुंबईकरांसाठी रेल्वे ही जीवनवाहिनी असली तरी आज ती मृत्यूची सावली बनली आहे. विशेषतः मध्य रेल्वेच्या कल्याण–कसारा–कर्जत मार्गांवर प्रवास करणं म्हणजे रोज जिवाशी खेळ करण्यासारखं झालं आहे. आपल्या पोटापाण्यासाठी लाखो चाकरमानी दररोज जीव मुठीत धरून हा प्रवास करत आहेत. ही केवळ सोय नसून, एक अगतिकता बनली आहे.दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान ट्रेनमधून १० प्रवासी खाली पडल्याची धक्कादायक घटना समोर आली असून दोन लोकल शेजारी जात असताना हा भीषण अपघात घडला.या घटनेनंतर जखमी प्रवाशांना तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय (शिवाजी हॉस्पिटल) येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी स्वतः रुग्णालयात भेट देऊन जखमी प्रवासी यांची विचारपूस केली आणि वैद्यकीय सेवांचा आढावा घेतला. जखमी प्रवासी मधील २ प्रवासी यांना उपचारासाठी जुपिटर रुग्णालय येथे दाखल केले असून बाकीचे प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे.या घटनेबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचीच खात्री करून घ्यावी, ही विनंती सर्व जखमी प्रवाशांच्या तात्काळ आणि योग्य उपचारासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. तसेच झालेल्या दुर्घटनेबाबत योग्य ती उपाययोजना करण्यात यावी अशी सूचना रेल्वेमंत्री यांना दिली असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली
Social Plugin