अहिल्यानगर
महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार (मीडिया) पदी श्री शिवाजी सिताराम सातव निवड झाल्याने त्यांना ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागामध्ये अनेक समस्याला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. आणि ग्रामीण भागामधील समस्या ह्या जागेवरती दाबल्या जातात. परंतु येथून पुढे ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक, कला, क्रीडा, आरोग्य, पर्यावरण इत्यादी क्षेत्रामधील समस्यांना वाचा फोडण्याचे काम मी महाराष्ट्र ग्रामीण न्यूज पत्रकार म्हणून पार पाडेल ,ग्रामीण भागाला न्याय देण्याचे कार्य माझ्या नूतन हातून घडेल अशी मी अशी ग्वाही सत्कारमूर्ती पत्रकार शिवाजीराव सातव यांनी दिली. भावी वाटचालीसाठी यावेळी डॉ.योगेश गायकवाड, अमोल उघडे ( शिक्षण तज्ञ), राजेंद्र धनवे सर, पोपट जमदाडे (विमा प्रतिनिधी) गावचे पोलीस पाटील बिभीषण यादव, जामखेड तालुका पथकाचे फलटण नायक अण्णासाहेब पवळ, होमगार्ड श्रीपती पवळ, राम पोटरे , बबन यादव, सतीश सातव, गावचे ग्रामसेवक सातपुते साहेब ओम साई फोटो संचालक जानू शिरसागर यांनी शुभेच्छा !
Social Plugin