Ticker

6/recent/ticker-posts

शाळेच्या पहिल्या दिवशी बदलापूर मध्ये वाहतूक कोंडी



ग्रामीणप्रतिनिधी/प्रसाद दिनकरराव : 

बदलापूर शहरात पूर्व पश्चिम वाहतुकीसाठी असलेल्या उड्डाणपूल आणि भुयारी मार्गापैकी भुयारी मार्ग गेल्या काही दिवसांपासून जोड रस्त्याच्या कामासाठी बंद आहे. त्यामुळे बदलापूर शहरातील एकमेव उड्डाणपूलावर मोठ्या प्रमाणावर भार येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कुळगाव बदलापूर जुन्या नगरपरिषद कार्यालया भागात वाहतूक कोंडी होते आहे. मात्र सोमवार शाळेचा पहिला दिवस असला तरी बदलापुरात महत्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्या मुळे परिणामी मुलांना शाळेत पोचण्याच अडथळा निर्माण झाला असून परिणामी वाहतूक कोंडीचा फटका स्कूल बस ला सुद्धा बसला आहे स्थानक परिसर, उड्डाणपूल, पूर्व भागातील कात्रप अशा सर्वच भागात कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लाग 

बदलापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्याचसोबत शहरात वाहनांची संख्याही वाढली आहे. शहरात जवळपास सर्वच रस्ते कॉंक्रिट केले जात असले तरी शहरात पूर्व पश्चिम प्रवास करण्यासाठी उड्डाणपुल उभारण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाला यश येताना दिसत नाही. त्यामुळे शहरात अस्तित्वात असलेल्या एकमेव उड्डाणपूल आणि भुयारी मार्गावर अवलंबून राहावे लागत आहे. बदलापूर शहराच्या मध्यातून गेलेल्या रेल्वे रूळामुळे शहर दोन भागात विभागले आहे. त्यामुळे पूर्व पश्चिम प्रवास करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

 बदलापूर मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नगरपरिषदेने जागोजागी सिग्नल यंत्रणे बसविण्यास सुरुवात केली आहे त्याचे काम युद्ध पातळीवरती सुरु असून वाढत्या वाहनांची संख्येमुळे बदलापूर शहरातील रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याचे अनुभव येत असतो. सायंकाळच्या सुमारास हि वाहतूक कोंडी अधिक प्रमाणात होत असते. हा प्रश्न मिटविण्यासाठी शहरात नवीन उड्डाणपूल करण्याची मागणीला जोर धरत आहे