Ticker

6/recent/ticker-posts

आदेश धाब्यावर तीन स्वतंत्र तक्रारींनी पोलीस विभागात खळबळ


 दिग्रस पोलीस स्टेशन चे तत्कालीन ठाणेदार सेवानंद वानखेडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात 


 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

दिग्रस पोलीस स्टेशन येथे दिनांक १४ जून २०२५ रोजी तत्कालीन ठाणेदार सेवानंद वानखेडे यांचा बदलीनंतरचा निरोप समारंभ पोलीस बंदोबस्तात, त्यांच्यावर फुलांचा वर्षाव, हार-गुलदस्त्यांपासून सजवलेल्या वाहनांद्वारे अत्यंत थाटामाटात बदली समारंभ साजरा करण्यात आला. मात्र पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई यांच्याकडून यापूर्वीच अशा कार्यक्रमांवर स्पष्ट बंदीचे लेखी आदेश असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचे सर्रास उल्लंघन केले असल्याचे समोर आले आहे.

या प्रकारामुळे पोलीस विभागात प्रचंड खळबळ उडाली असून, याविरोधात एकूण तीन स्वतंत्र तक्रारी पोलीस महासंचालक मुंबई कार्यालयाकडे सादर करण्यात आल्या आहेत. तक्रारकर्ते गौतम विठ्ठल धवने (CRPF कमांडो, भारत सरकार) यांनी आपले सरकार पोर्टलवरून पोलीस महासंचालक मुंबई यांना तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली. तथा मो. शहबाज मो. अकील सामाजिक कार्यकर्ता व जिल्हाध्यक्ष माहिती अधिकार यवतमाळ यांनी सुद्धा केलेल्या तक्रारीमध्ये नमूद आहे की ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या बदली आदेशानंतरही दिनांक १४ जून रोजी दिग्रस पोलीस ठाण्यात शासनाच्या आदेशांना धाब्यावर बसवून सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात आला.या मध्ये पोलीस गणवेशात मिरवणूक पुष्पवृष्टी हार-गुलदस्ते आणि सजवलेली गाडी आदेशाचा सरळ भंग केलेला आहे.संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबन व विभागीय चौकशी लावण्याबाबत तक्रारीत नमूद केलेले आहे.तथा ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण संस्था, पुणे ISO प्रमाणित नामांकित संस्था यांनी पण संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याबाबत पाऊल उचलले आहे.पुणे येथील “ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण संस्था” हिने देखील याच प्रकरणी लेखी निवेदनासह फोटो, वृत्तपत्रीय पुरावे, व आदेशाच्या प्रती संलग्न करून मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयाकडे तक्रार सादर केली आहे. संस्थेने यास “शिस्तबाह्य व अपप्रचारात्मक कृत्य” म्हणून ठपका ठेवला आहे. तथा ज्ञानमाता प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आब्राहम आढाव यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास या प्रकरणाला राज्यव्यापी आंदोलनाचे स्वरूप देऊ असा इशारा दिलेला आहे. याकडे पोलीस प्रशासनाची काय भूमिका असेल नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.