बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी यात्रा म्हणून लौकिक असलेल्या पुसेगावची शान आज प्रशासकीय उदासीनतेमुळे धोक्यात आली आहे. यात्रा संपून १५ दिवस उलटले तरी ७०-८० मीटर रस्त्याचा एक तुकडा प्रशासनाला मध्यस्थीने पूर्ण करता आलेला नाही. लोकप्रतिनिधींची आश्वासनेही हवेत विरली असून, आता ग्रामस्थांनी "आम्ही पुसेगावकर" म्हणून स्वतःच रस्त्यासाठी कंबर कसण्याची वेळ आली आहे, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते नितीन देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
आश्वासनांचा पाऊस, पण जमिनीवर मात्र दुर्गंधीचा वेढा! दिसून येत आहे.
आमदारांनी १० दिवसांपूर्वी दोन-तीन दिवसांत काम सुरू होईल असे आश्वासन दिले होते, मात्र आजही परिस्थिती 'जैसे थे' आहे. बाचल कॉर्नरवर गटाराचे पाणी साचून ते थेट मंदिराच्या परिसरापर्यंत पोहोचत आहे. ज्या पवित्र नगरीत भाविक श्रद्धेने येतात, तिथेच दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करावा लागत असल्याने ग्रामस्थांच्या व भाविकांच्या आरोग्याचा आणि गावच्या प्रतिमेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्रशासनाच्या मध्यस्थीचे 'घोडे' अडकले कुठे? प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी मदतीचे आश्वासन देऊनही काम का रखडले? बाह्य वळण रस्त्यासाठी (By-pass) तत्परता दाखवणारे शासन, अंतर्गत रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहे? असा प्रश्न देशमुख यांनी विचारला आहे.
बाजारपेठेचे अस्तित्व धोक्यात येऊ नये यासाठी अंतर्गत रस्ता वेळेत झाला नाही, तर पुसेगावची मुख्य बाजारपेठ भविष्यात ओस पडण्याची भीती निर्माण झाली आहे. व्यापार वाचवण्यासाठी अंतर्गत कनेक्टिव्हिटी असणे अनिवार्य आहे.बाधितांच्या मोबदल्याचा प्रश्न जरुरीचा असून, रस्त्याच्या कामात ज्यांचे नुकसान होत आहे, त्यांना वाऱ्यावर न सोडता, ट्रस्ट किंवा लोकवर्गणीतून योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी तातडीने हालचाली होणे गरजेचे आहे.
आता केवळ 'लोकसहभाग' हाच पर्याय? राहिलेला असून राजकीय गट-तट बाजूला ठेवून, लोकप्रतिनिधींच्या आश्वासनावर अवलंबून न राहता, गावाने एकत्र येऊन, लोकवर्गणीतून हा रस्ता पूर्ण करावा का? असा पर्याय आता समोर येत आहे.
"आपले गाव, आपला रस्ता" आता निर्णयाची वेळ असून,
पुसेगाव देवस्थानचे महात्म्य वाढत असताना, सोयीसुविधांचा अभाव असणे ही बाब येथील जनतेला मान खाली घालावी लागणारी आहे. "बाहेरून येणारे भाविक पुसेगावबद्दल काय मत घेऊन जातील?" असा सवाल करत नितीन देशमुख यांनी सर्व ग्रामस्थांना व बाधितांना संघटित होण्याचे आवाहन केले आहे. आता केवळ घोषणाबाजी नको, तर ठोस कृती हवी, अशी भावना पुसेगावकरांमध्ये उमटत आहे.
"आम्ही अभिमानाने सांगतो की आमची यात्रा मोठी आहे, मग मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची ही दुरावस्था का? आता कोणाच्याही नादाला न लागता आपणच आपल्या कामासाठी कंबर कसली पाहिजे."व सर्व पुसेगावकरांनी एकत्र येऊन बधितांसाठी मोबदला देऊन हे रस्त्याचे काम मार्गी लावण्याची गरज असल्याचे नितीन देशमुख यांनी म्हटले आहे.
: रखडलेल्या 70 ते 80 मीटर चे काम पूर्णत्वास जाण्यास अजून किती दिवस लागणार आहेत आमदार साहेबांनी मागील दहा दिवसात सांगितले होते की दोन ते तीन दिवसात काम चालू करू परंतु अजूनही जैसे थे परिस्थिती तिथे आहे अजून तिथे वरून येणारे गटराचे पाणी बाचल कॉर्नर वर येऊन परत ते रस्त्यावर येत आहे व मंदिरात ते जात आहे तिथून जाताना दुर्गंधीचा वास यायला परत सुरुवात झाली आहे देवस्थान ट्रस्ट व सुवर्णगिरी ग्रामपंचायत यांनी याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सुरुवात करावी काही लोकांचे जात आहे त्यांना आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून किंवा आपल्या लोकवर्गणीतून त्यांना काय देता येते ते बघावे व लवकरात लवकर निर्णय घेऊन त्या रस्त्याचे काम मार्गी लागण्यास प्रयत्न करावा यात्रा होऊन पंधरा दिवस उलटून गेले आहेत अजूनही त्याच्याकडे कोणी लक्ष घालत नाही आपण मानाने सांगत आहोत आमच्या गावची यात्रा महाराष्ट्र मध्ये तीन नंबरचे आहे व महाराजांचा परिसर जिथे मंदिराकडे जातो तिथेही अवस्था बघून कोन याच्यावरही विश्वास ठेवेल का आपल्याला राहिलेले काम कोण करणार यापेक्षा सर्व गावातील लोकांनी आता ठरवावे की आपण ते काम करू शकतो आपण लोक वर्गणी काढू कुणाच्याही नादाला न लागता आपण आपले काम पूर्णत्वास नेऊ असे मला वाटते बाकी सर्वांची काय इच्छा आहे ते सर्वांनी सांगावे म्हणजे काम करण्यास सुरुवात होईल आपण म्हणतो आमदार साहेब करून पंचायत करेल ट्रस्ट करेल केव्हा काम करणार आहे .





Social Plugin